गाव
राम प्रहरी गावाकडं, एकच लगबग असायची
गाई वासराच हंबरन, बादलीला चरवी घासायची.
दुधाच्या धारेचा तो मंजुळ आवाज,
कान तृप्त करून जायचा
पशु पक्षांचा किलबिलाट, कसा मंद मंद चालायचा.
विहिरी वरची मोट अन, मोटेची कुई कुई असायची
हिरवीगार शेतं पाहून, नखऱ्या पाखऱ्या डोलायची.
नखऱ्या पाखऱ्याच्या तालावर, मोटकरी गाणं गायचा
थाळण्यातून वाहणारं पाणी, पाण्यान दांड भरून वहायचा
वाफ्या वाफ्यातून पाणी कसं, मातीला भिजवत रहायचं
भिजलेल्या मातीचा सुगंध घेत, मन कसं भरून जायचं.
आता मात्र... आता मात्र....
मोट नाही, नाडा नाही, नाही गाईच हंबरन
दूध नाही, धार नाही, नाही मातीचा सुगंध
सारं कसं दिवसेंदिवस, चिराख होत गेलं
शहरीकरणानं गावाचं, गावपण हिरावून नेलं.
शहरीकरणानं गावाचं, गावपण हिरावून नेलं....
📚🖋️ राहुल मोरे
९४२१६१२९७९

आपल्या बालपणी ची आठवण करुन देणारी कविता आहे .,सर
ReplyDeleteखूपच छान👌👌👌
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteअप्रतिम,👌👌👌
ReplyDeleteमस्त, एकदम भारी आहे 👍👍
ReplyDelete