मा.आ.राजीव दादा (शांत युगाचा झाला अंत)
शांत, सोज्वळ, मितभाषी, अजातशत्रू
हे सारे गुण तुमच्यात दडले होते.
तुमच्या जाण्याने सर्व सामान्यच काय?
तर आसमंत देखील रडले होते.
आज शांत युगाचा झाला अंत
शोकमय झाला सारा आसमंत.
चाळीसगाव नगरीचे विकास पर्व,
आज थांबले याची खंत.
राजकारणा सोबत समाजकारण,
दादासाहेब तुम्हीच करावे.
रोजच येतात-जातात सर्व,
तुम्ही मात्र किर्तिने उरावे.
चाळीसगाव नगरीचे भगीरथ पुत्र,
जलदूत तुमची ओळख होती.
तेलाने दिवे सर्वच पेटवतात,
पाण्याने तुम्ही पेटवल्या जीवन-ज्योती.
विकास नगराचा कसा करावा,
हे तुम्हीच दाखवले होते.
पोस्टरबाजी, जाहिरात करूनी
जनतेला तुम्ही फसवले नव्हते.
मनामनावर अधिराज्य करणारा
आज माणुसकीच्या झरा आटला.
चाळीसगाव नगरीच्या तळपत्या सूर्या
नियतीने मात्र एकट्यात गाठला.
नियतीने मात्र एकट्यात गाठला.......
📚🖋️ राहुल मोरे
९४२१६१२९७९
