भ्रष्ट राजकारण
आघाडी आणि पिछाडी ही जनतेची दिशाभूल आहे
सत्तापीपासून लोकांची ही वेगळी चूल आहे
मतदारांच्या भावनेशी खेळून लोकशाहीचा आव आणायचा
ईव्हीएम खरेदी करून विजय खेचून घ्यायचा
इथ नाही तिथं नाही साऱ्या देशात हेच चाललंय
जनतेनेही आता दगडांना देव मानलय
नको त्या दगडांना ईव्हीएम शेंदूर लावतोय
खऱ्याखुऱ्या देवांना देवळातून बाहेर काढतोय
माणुसकीचा गहिवर कुठेतरी आटताना दिसतोय
काना खांद्यावर बंदूक ठेवून माणूस विकला जातोय
हा सारा बेबनाव, नैतिकतेतच खोट आहे
संविधान आणि लोकशाहीचा मात्र गळा घोट आहे
नीतिमत्ता गहाण ठेवून ओरबाडलेला विजय नको
न घटनेची कत्तल करणारा हा असा अजय नको
📚🖋️ राहुल मोरे
९४२१६१२९७९