माणूस हरवत चाललाय
सुगीचे दिवस आलेत की माझ्या बापाची
एकच धांदल असायची
मठ, मुग ज्वारी बाजरी याचे खळे लावायचे.
बाजरीची सुडी,मठाची गंजी घालून व्यवस्थित
शेकारायचे,
ह्या आवकळी पावसाच्या धाकाण.
मायचं मात्र मधीच टूमण असायचं
चार दिवसांवर दिवाळी आली...,
विना गोड धोडाची दिवाळी
चटणी भाकरीवर निघायची
आख्खी दिवाळी हंगाम आवरण्यात जायची
पण,
तरी सुध्दा त्या दिवाळीत मज्जा असायची
गोड धोड नसलं म्हणून काय झालं
गोड माणसं मात्र सोबत राहायची.
काका काकू आत्या मामा अन् सारी भावंडं
यांनी घर कसं भरून जायचं
शरिरान वेगळे तरी मनानं एक रहायचं
आता मात्र तसं काही उरलं नाही.
एका घराची दोन दारं झाली
कामा धंद्याच्या निमित्तानं
माणसं शहराकडे गेली.
आता दिवाळीला एकत्र येत नाही.
आलेच तर दोन दिवसाच्या वर राहत नाही.
राहिलीच तर एफडी, भिसी, फ्लॅट आणि कार
याचंच तुणतुणं चालतं फार
माया, ममता हरवत होती
आपुलकीनं विचारपूस नव्हती
अवकाळी पावसाच्या धाकान बाप गंजी, सूडी
झाकायचा.
पण, आता काय?
इथं आपलेपणाचाच दुष्काळ पडत चाललाय.
माणूस जिता असून हरवत चाललाय
बापाच्या मनातली
ती सुगी, ती गंजी काही केल्या जात नाही.
जीव तीळ तीळ तुटल्या वाचून राहत नाही
पण त्याला कुठ माहीत..
की,
या सिमेंटच्या जंगलात माणसं झालीत परकी
आता आपल्याजवळ फक्त ती आठवण
डोळ्यांची खासड झाल्या सारखी.
📚🖋️ राहुल मोरे
९४२१६१२९७९

सुंदर!😊👌🏻👍🏻
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteसुंदर लेख आहे
ReplyDeleteछान
ReplyDeleteकविता वाचत असताना एक गावाकडे फेरी होते आणि शेवट एक मनाला चटका देऊन जाणारी आहे
ReplyDeleteअतिशय समर्पक शब्दात माणसातील माणुसकी हरवत चालली याची मांडणी केली आहे 👍
ReplyDeleteNice
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete